डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन






Deccan Maratha Education Association

असोसिएशनची स्थापना




डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनची स्थापना
लॉर्ड रिपन यांनी इ.स. १८८२ मध्ये हिंदुस्थानातील शिक्षणविषयक प्रगतीची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन स्थापन केले. त्यांच्या उदारमतवादी धोरणामुळे सर्व लोकांना शिक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका घेणान्या सुधारकांच्या आशा पल्लवित झाल्या. यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत शिक्षण जाईल असा आशावाद त्यांना वाटत होता. गंगारामभाऊ भोवताली घडणाऱ्या अशा घटना-प्रसंगाशी नेहमीच सजग होते. 'याच वेळी पुण्यात पुढारलेल्या वर्गातील काही पदवीधरांनी न्यू इंग्लिश स्कूल, नेटिव्ह इन्स्टिट्यूट व नूतन मराठी विद्यालय अशा खासगी संस्था स्थापन केल्या.याच सुमारास जोतीराव फुले, रा. ब लोखंडे, भाऊपाटील डुंबरे, कृष्णराव पांडुरंग भालेकर, गंगारामभाऊ म्हस्के वकील यांनी मागासलेल्या वर्गात कर्तव्यजागृतीस आरंभ केला. पुणे व मुंबई येथे सत्यशोधक समाज व दीनबंधु सार्वजनिक सभा अशा संस्था स्थापन करण्यात मनात घोळू लागला.मराठा समाजात विद्येचा प्रसार न होण्यास त्यांची अनास्था व दारिद्र्य ही मुख्य कारणे आहेत हे गंगारामभाऊंच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी वैयक्तिकरीत्या इ.स. १९८३ पासूनच हुशार व होतकरू मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रूपाने द्रव्यसाह्य सुरू केले. गंगारामभाऊ कोणतीही संस्था स्थापन करण्यापूर्वी तिचा पाया मजबूत करत. भविष्यातील त्या संस्थेची उपयोगिता दूरदृष्टीने तपासून पाहत.त्यामुळे स्थापन केलेली संस्था लोकोपयोगी ठरून अनेक वर्ष कार्यरत राहत असे. संस्था स्थापनेविषयी तावडे म्हणतात,'गंगारामभाऊ म्हस्के यांनी अविश्रांत श्रम करून आपल्या काही मित्रमंडळींच्या व इतर समाजातील थोर मंडळींच्या साह्याने व सहानुभूतीने डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन पुणे ही संस्था स्थापन केली.

या वेळी मे.ली. वॉर्नरसाहेब, कै. रानडे व इतर समतावादी मंडळींचे या संस्थेस पूर्ण साह्य मिळाले. या संस्थेचा नामकरणविधी ८ जानेवारी १८८३ मध्ये पुणे येथील हिराबागेतील टाऊन हॉमध्ये सर विल्यम वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली झाला. असोसिएशनचा उद्देश सर्वांना समजावा म्हणून १८८७ मध्ये गंगारामभाऊंनी एक पत्रक छापून प्रमुख लोकांना आणि खेडेगावातून वाटले होते. नसेच असोसिएशन मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते याची सर्वत्र प्रसिद्धी व्हावी हणून वेळोवेळी ज्ञानप्रकाश, राष्ट्रवीर, मराठा आणि नवजीवन या वृत्तपत्रातून सिद्धी दिली जात असे. संस्थेचे पहिले अध्यक्ष सर विल्यम वेडरबर्न होते. तर संस्थेचा सर्व कार्यभार सेक्रेटरी म्हणून गंगारामभाऊ पाहत होते. जनरल कमिटीचे अध्यक्ष श्रीमंत मुधोजीराव बापूसाहेब निंबाळकर फलटणचे अधिपती होते. सभासदांत सर विल्यम वेडरबर्न, मि.ली. वॉर्नर, ना. जस्टिस क्रो. खान बहाद्दूर दस्तूर जामस्पजी, खा. ब. खंडाळावाला, डॉ. भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, सीताराम विश्वनाथ पटवर्धन, बेदरकर, रघुनाथ शिवराम टिपणीस, विष्णू मोरेश्वर भिडे, रंगो रामचंद्र बर्डी, सरदार कुपुस्वामी मुदलिवार, रिसालदार मेजर रावजीराव सावंत, दोराबजी दादाभाई बुटी, श्री. चिंतामणराव नातू, रा.सा. फाटक, दि.ब. धामणसकर, दो. दादा नाथाजी शेळके, राजान्ना लिंगू अशी सर्व जाती आणि धर्मातील जाणक मंडळी होती.
सयाजीराव महाराजांचा आश्रय
पाहण्यासाठी इ.स. १८८५ मध्ये एक प्रतिनिधी मंडळ भेटण्यासाठी गेले, 'श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड सरकार, सेना खासखेल समशेर बहादुर ह्यांची स्वारी पुणे मुक्कामी आली होती.


श्रीमंताकडे रा.ब. महादेव गोविंद रानडे, रा.रा. गंगारामभाऊ म्हस्के वकील, रा.रा. राजान्ना लिंग वकील आणखी दोन तीन सभ्य गृहस्थ ह्यांचे डेप्युटेशन गेले.गायकवाड़ सरकारांनी डेप्युटेशनचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व डेप्युटेशनास कळविले की, मंडळींचा उद्देश फार चांगला आहे. आम्ही या फंडास दरसाल बाराशे रु देत जाऊ.सियाजीराव महाराजांनी या मदतीबद्दल त्यांचे अधिकारी आणि मित्र खासेराव जाधवांना पत्राद्वारे कळवले.तर प्रत्यक्षात त्यांनी बाराशे रुपये मदत सुरू केल्याची नोंद बडोदा प्रशासकीय अहवालात आहे. त्यानंतर ही रक्कम वाढवून त्यांनी पुढे २४०० रुपये केली. शिष्यवृत्तीची मागणी वाढताच शिक्षणप्रेमी सयाजीराव महाराजांनी मुलींच्या शिक्षणासाठी दरवर्षी १४०० रुपयांची शिष्यवृत्ती सुरू केली.सियाजीराव महाराजांनी संस्थेला प्रथम १२०० व नंतर २४०० रुपये मदत सुरू केली. त्यानंतर काही वर्षांनी कोल्हापूर संस्थानच्या शाहू महाराजांनी वार्षिक ३०० रुपये देण्यास सुरुवात केली. यामुळे असोसिएशनचे कार्यक्षेत्र विस्तारले.परिणामस्वरूप अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळू लागल्या. यासाठी गंगारामभाऊ दिवसरात्र परिश्रम घेत होते. अनेकांना सोबत घेऊन संस्थेच्या देणग्या जास्तीत जास्त कशा वाढतील या कड़े त्यांचे सर्व लक्ष होते.संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा ५ डिसेंबर १८८७ रोजी पुणे सार्वजनिक सभेच्या जोशी हॉलमध्ये भरविण्यात आली. यामध्ये इ.स. १८८५ आणि १८८६ या दोन वर्षांचा अहवाल मि. आर्थर क्रोफर्ड यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत सादर करण्यात आला.